PM Kisan 2024 : योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपयांहून अधिक लाभ हस्तांतरित करण्यात आले !
पंतप्रधान किसान योजनेचा परिणाम वाटला जातो. महाराष्ट्रातील यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेतील लाभाचा 16 वा हप्ता जारी केल्याने या योजनेच्या लाभार्थी शेतकरी कुटुंबांची संख्या 11 कोटींहून अधिक झाली असून आतापर्यंत या योजनेतून एकूण 3 लाख कोटी रुपयांचे हस्तांतरण झाले आहे. पात्र शेतकऱ्यांना कोविड काळात थेट आर्थिक लाभाची सर्वात जास्त गरज होती तेव्हा यातील पावणेदोन लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते.
PM Kisan 2024
![PM Kisan 2024](https://www.balirajayojana.com/wp-content/uploads/2024/03/www.balirajayojana.com-25-1-1024x576.jpg)
PM-Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपयांहून अधिक लाभ हस्तांतरित करण्यात आले !
देशातील शेतकरी कुटुंबांना सकारात्मक पूरक उत्पन्नाची असलेली गरज लक्षात घेऊन उत्पादक, स्पर्धात्मक, वैविध्यपूर्ण, समावेशक आणि शाश्वत कृषी क्षेत्राला चाल…
सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून योजनांची संपृक्तता साधण्याच्या दृष्टीने देशातील 2.60 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात नुकत्याच राबवलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा भाग म्हणून पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत नव्या 90 लाख पात्र शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे.
![MahaJobKatta](https://mahajobkatta.com/wp-content/uploads/2023/05/WhatsApp-Image-2023-05-16-at-9.35.45-AM.jpeg)
Whatsap Gr.oup ज्वॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा:- Click Here
📑 हे पण बघा : नाममात्र गुंतवणुकीतून कधीकाळी सुरू केलेला मशरूम व्यवसायातून हा शेतकरी आज कमावत आहे वार्षिक 10 लाख!
गेल्या 5 वर्षांत, या योजनेने अनेक महत्त्वाचे टप्पे ओलांडले असून या योजनेचा निखळ दृष्टीकोन, व्यापक प्रमाण तसेच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये निधीचे थेट आणि सुरळीतपणे हस्तांतरण होत असल्यामुळे जागतिक बँकेसह अनेक संघटनांकडून या योजनेची प्रशंसा केली जात आहे.
![PM Kisan 2024](https://www.balirajayojana.com/wp-content/uploads/2024/03/www.balirajayojana.com-25-1-300x169.jpg)
आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की पीएम – किसान योजने अंतर्गत मिळणारे लाभ बहुसंख्य शेतकर्यां… बांगला, मल्याळम, गुजराती, पंजाबी, तेलुगू आणि मराठी या 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. ही योजना सहकारी संघवादाचे एक उत्तम उदाहरण आहे. कारण, या योजनेत राज्ये शेतकर्यांची नोंदणी करतात तसेच शेतकर्यांची पात्रता देखील पडताळतात, तर भारत सरकार या योजनेसाठी 100% निधी पुरवते. या योजनेचे सर्वसमावेशक स्वरूप यातून दिसून येते की या योजनेच्या चार लाभार्थींपैकी किमान एक महिला शेतकरी आहे, याशिवाय 85 % हून अधिक छोटे आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.